महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थितीत बघता महाविकास आघाडीचे सरकार टीकून रहाण्याची शक्यता दिसत नाहीये. शिवसेनेत झालेले बंड आणि पडद्यामागे भाजपाची रणनिती बघता आता काँग्रेसना त्यांच्याच आमदारांची चिंता वाटू लागली आहे. काँग्रेसमधील एका गटाच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व काँग्रेसला एकत्रित ठेण्यासाठी हालचाल करत नाहीये आणि पक्षातील काही आमदार हे सहज भाजपाच्या रणनितीचे लक्ष्य ठरु शकतात. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बुधवारी रात्री काँग्रसने निरिक्षक म्हणून कमलनाथ यांना परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी पाठवले होते. काँग्रेस पक्षाच्या ४४ आमदारांशी संवाद साधत परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. महाराष्ट्राती महाविकास आघाडी आता राहत नसल्याच्या निष्कर्षापर्यंत काँग्रेस नेतृत्व आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमलनाथ यांनी महाराष्ट्रात आल्यावर राज्यातील परिस्थितीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवादही साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून निघण्यापूर्वी राज्यातील परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला अवगत केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After shiv sena now congress has a fear of losing their mlas
First published on: 24-06-2022 at 17:52 IST