Akhilesh Yadav on feud speculations about India bloc : इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये धुसफूस चालू असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आता फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा चालू आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेली टीका, त्यांनी ईव्हीएमबाबत काँग्रेसविरोधात घेतलेली भूमिका, त्यानंतर अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जींनी दिलेला ‘एकला चलो रे’चा नारा आणि आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिलेला स्वबळाचा नारा पाहून इंडिया आघाडी आता केवळ नावापुरतीच राहिली आहे असं त्यांचे विरोधक बोलू लागले आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीतील प्रमुख नेते तथा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीमधील संघर्षाबाबतच्या, आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच आमची इंडिया आघाडी मजबूत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यादव म्हणाले, “भाजपाविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. समाजवादी पार्टी या आघाडीला बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांबरोबर निर्धाराने उभे आहोत. भाजपाच्या विरोधकांना मदत करण्यास आमचा पक्ष नेहमीच सज्ज असेल”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा