उत्तरप्रदेशात रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादामध्ये आता स्वामीप्रसाद मौर्य यांची भाजपा खासदार संघमित्रा मौर्याही उतरल्या आहेत. स्वामीप्रसाद मौर्य यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावर वाद होण्यापेक्षा चर्चा झाली पाहिजे असं संघमित्रा मौर्य यांनी म्हटलं आहे. काही लोक अकारण हा वाद उकरून काढत आहेत असंही संघमित्रा यांनी म्हटलं आहे. रामचरितमानसवरून उत्तर प्रदेशात वाद निर्माण झाला आहे. आता भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी या प्रकरणात वक्तव्य केलं आहे. आपल्याला मन मोठं करावं लागेल असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच जो वाद घातला जातो आहे त्यापेक्षा इतरही महत्त्वाचे विषय आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वामीप्रसाद मौर्य यांनी काही ओळींवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

सपा नेते आणि आमदार स्वामीप्रसाद मौर्य यांनी रामचरित मानसच्या काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यांनी रामचरितमानस बकवास आहे असंही म्हटलं होतं. तुलसीदासांनी ते आपल्या आनंदासाठी लिहिलं आहे असाही दावा त्यांनी केला होता. एवढंच नाही तर रामचरितमानस मध्ये ज्या काही आक्षेपार्ह ओळी आहेत त्या ओळी सरकारने हटवल्या पाहिजेत. तसं करणं शक्य नसेल तर थेट रामचरितमानसवर बंदी घालावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यावरून वाद झाला होता. आता त्यांची मुलगी आणि भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी या विषयावर वाद होण्यापेक्षा सविस्तर चर्चा झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid ramcharitmanas row bjp mps advice to party bada dil karna padega scj
First published on: 26-01-2023 at 19:39 IST