उमाकांत देशपांडे

मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे असलेल्या अमित साटम यांनी २००० मध्ये एमबीए (एचआर) चे शिक्षण पूर्ण केले. एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीही लगेच मिळाली. पण राजकारणाची आवड असल्याने नोकरी करीत असतानाच अंधेरीमध्ये भाजपचे काम सुरु केले आणि विभाग (वॉर्ड) सरचिटणीस झाले. सुमारे चार वर्षांनंतर नोकरीचा राजीनामा देऊन साटम यांनी पूर्णवेळ भाजपचे काम सुरु केले. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे सचिव म्हणून दोन वर्षे काम केले व पुढे अंधेरी भाजप तालुका अध्यक्ष झाले.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

त्यानंतर २००७ मध्ये महापालिका निवडणूक लढविली, पण त्यात पराभव झाला. मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून काम केले. पुढे महापालिकेची निवडणूक २०१२ मध्ये दुसऱ्यांदा लढविली व निवडून आले. भाजप-शिवसेना युती २०१४ मध्ये तुटल्यावर साटम यांना अंधेरी (प.) मधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ते निवडून आले. आमदारकी सांभाळत असताना ते पक्षाचे जिल्हाध्यक्षही होते. साटम यांनी २०१९ मध्येही विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते दुसऱ्यांदा निवडून आले.

हेही वाचा: अब्दुल सत्तारांच्या मदतीला एमआयएम; शिवसेनेवरच आरोप

आमदार आणि नगरसेवक पदाच्या कारकीर्दीत साटम यांनी अनेक सामाजिक कामे केली असून जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. जुहू चौपाटी सुशोभीकरण, मतदारसंघात ४५ उद्याने विकसित करणे, ७५ सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली. मुंबईतील रस्त्यांवर एलईडी पथदिव्यांसाठी साटम यांनी २०१४ मध्ये अंधेरीत उपोषण व आंदोलन केले होते. रस्तेबांधणी करताना भूमिगत वाहिन्यांसाठी (डक्ट) साटम यांनी आग्रह धरला होता.

हेही वाचा: भाजप-एमआयएममधील श्रेयवादात धुळ्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

रस्तेबांधणी, सुशोभीकरणासह अन्य कामांच्या निविदा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारने आणि महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारांची अनेक प्रकरणे उघड करुन साटम यांनी विधीमंडळात आवाज उठविला आहे व रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली आहेत. अंधेरीत मोठा नवरात्रोत्सव आणि अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजनही त्यांनी केले आहे.