दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाच्या विरोधासाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मागत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेटही घेतली. मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. आपचे प्रमुख केजरीवाल कठोर हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
ओवैसी म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी कलम ३७० बाबत भाजपाला पाठिंबा का दिला? आता ते का रडत आहेत? मी अरविंद केजरीवाल
हे वाचा >> “मोदी सरकारमध्ये हिंमत असेल, तर…”, असदुद्दीन ओवेसींचं खुलं आव्हान; म्हणाले, “२ हजार किलोमीटर…!”
आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे,
२८ मे रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी अधेनाम मठातील मठाधीशांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविला. हा सेंगोल नव्या इमारतीमधील लोकसभेच्या दालनात ठेवण्यात येणार आहे. तामिळनाडूमधील विविध अधेनाम मठातील पुजारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. ओवैसी म्हणाले की, जर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमारतीचे उद्घाटन केले असते तर मी या सोहळ्याला उपस्थित राहिलो असतो. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः उद्घाटन करू नये, असा मुद्दा उपस्थित करून २० विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.