मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या रवींद्र वायकर यांना फक्त २२१ मतांची आघाडी देणाऱ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम यांना यंदा कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या अशोक जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तेच यावेळी पुन्हा समोर आहेत. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी असून शिवसेनेतील फुटीनंतर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र असल्याचा फायदा जाधव यांना मिळणार असून तीच साटम यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

२००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वीच्या आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन हा नवा मतदारसंघ निर्माण झाला व काँग्रेसचे अशोक जाधव ५९ हजार ८९९ मते मिळवून आमदार बनले. भाजप-सेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परंतु सेनेच्या विष्णू कोरगावकर यांना फक्त २७ हजार ७४१ मते मिळाली. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसच्या जाधव यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी भाजप व सेना स्वतंत्रपणे लढत असल्याचा फायदा भाजपाला झाला आणि साटम पहिल्यांदा आमदार बनले. त्यावेळी जाधव यांना ३४ हजार ९८२ आणि सेनेच्या जयवंत परब यांना २६ हजार ७२१ मते मिळाली. २०१९ मध्ये युती असल्यामुळे साटम यांच्या मतांमध्ये वाढ होऊन त्यांना ६५ हजार ६१५ मते मिळाली तर जाधव यांना ४६ हजार ६५३ मते मिळाली. यावरून एक मात्र निश्चित आहे की, काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) यांची एकत्रित मते साटम यांना विजयापासून दूर नेऊ शकतात. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यानंतरच अशोक जाधव अधिक सक्रिय झाले. त्याआधी त्यांचा फारसा संपर्क या मतदारसंघाशी नव्हता. त्यामुळे जाधव यांना मतदारांची कितपत साथ मिळते यावर या साटम यांचे भवितव्य अवलंबून आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा >>>पूर्व नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपपुढे प्रथमच आव्हान

या मतदारसंघात ८१ हजार १०० (२८ टक्के) मुस्लिम तर ६७ हजार ८०० (२४ टक्के) मराठी मते आहेत. याशिवाय गुजराती-मारवाडी ४१ हजार ७०० तर उत्तर भारतीय ४१ हजार १०० मते आहेत. याशिवाय २७ हजार दक्षिण भारतीयांची मते आहेत. यापैकी बरेचसे मतदार हे उच्चभ्रु, उच्च मध्यमवर्गीय वस्तीत राहतात. मतदार करण्यात फारसे उत्साही नसतात. याउलट येथे मोठ्या संख्येने इंदिरा नगर, कपासवाडी, गावदेवी आदी झोपडपट्टीचा परिसर असून तो हमखास मतदानाला उतरतो. त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत झाला होता. यंदाही तशीच स्थिती राहिली तर साटम यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे.

हेही वाचा >>>कारंजामध्ये मतदारांचे पाठबळ कुणाला?; कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित

गेल्या दहा वर्षांत सक्रिय आमदार म्हणून साटम यांची मतदारसंघात प्रतिमा असून विधीमंडळाच्या उत्कृष्ट संसदपटूचेही ते मानकरी ठरले आहेत. उच्चभ्रु, उच्च मध्यमवर्गीयांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था, अत्याधुनिक परिसर व्यवस्थापन (एएलएम) या संस्थांच्या माध्यमातून साटम यांनी जोरदार संपर्क जाळे निर्माण केले आहे. या मतांच्या जोरावरच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी आघाडी मिळाली होती. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्याने साटम थोडे धास्तावले आहेत. त्यातच माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी बंडखोरी मागे घेतल्याने मुस्लिम मतांचे विभाजन टळले आहे. त्यामुळेच साटम यांना ही निवडणूक यंदा सोपी नाही, असे जाणकारांना वाटत आहे. मात्र साटम यांनी पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार केला असून आपणच आमदार असू, याबाबत ते ठाम आहेत.

एकूण मतदार – दोन लाख ८८ हजार १२५ : एक लाख ४८ हजार ८४६ (पुरुष), एक लाख ३९ हजार २७२ (महिला)

Story img Loader