लोकसभा निवडणूक होण्यासाठी अवघ्या दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. अशात जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पूर्ण कधी होईल याची वाट विरोधातले पक्ष पाहात आहेत. ज्यांची विचारधारा सामायिक आहेत असे पक्ष या गोष्टीची वाट बघत आहेत. जेणेकरून विरोधकांना एकत्र येता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये भाजपाच्या विरोधात येणार महाआघाडी

बिहारमध्ये काँग्रेस आणि जदयू चं सरकार आहे. महाराष्ट्रात जो सत्ताबदल झाला त्यानंतर भाजपाची साथ सोडून नितीश कुमार महाआघाडीसोबत गेले. त्यानंतर आता त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. भाजपाला २०२४ च्या निवडणुका जिंकू द्यायच्या नसतील तर सगळ्या विरोधी पक्षांची मोट बांधणं आवश्यक आहे. हे पक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपण्याची वाट पाहात आहेत असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा व्यक्तीगत प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा विरोधक एकत्र येतील तेव्हा काँग्रेसने सोबत आलं पाहिजे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Await meeting of like minded parties for lok sabha polls says bihar cm nitish kumar scj
First published on: 27-01-2023 at 21:36 IST