बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज(रविवार) त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठी घोषणा केली. आगामी विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून, स्वबळावरच या निवडणुका लढवणार असल्याचे मायवतींनी जाहीर केले आहे.

याशिवाय लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना मायावतींनी काँग्रेसवर संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप केला. आणि म्हटले की, त्यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आघाडीकरून निवडणूक लढवली मात्र परिणाम आणि अनुभव योग्य राहिला नाही. म्हणून आता बसपा स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि काही अन्य पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आमची विचारधारा ही अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे.

sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार
Hitendra Thakur, left, support from the left,
डाव्यांची साथ नसल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार ?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक व्हावी –

यावेळी मायावतींनी मागणी केली की, आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. मागील काही वर्षांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान होत असल्याने लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे बसपाची निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडे ही मागणी आहे की, आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात.

ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे, काहीजण त्यात खटपट करत आहेत. बॅलेट पेपरच्यावेळी आमच्या जागांची संख्या आणि सर्व मतांची टक्केवारी ही वाढलेली असायची. पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेणे आवश्यक आहे.

आरक्षणाबाबत सर्व पक्षांचा क्रूर दृष्टिकोन –

मायावती म्हणाल्या की, बसपाला पुढे जाण्यापासून रोखलं जात आहे. आरक्षणाबाबत सर्व सरकारांचा दृष्टिकोन क्रूर राहिला आहे. आरक्षणाबाबत भाजपाही काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. याचा उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळाला आहे. समाजवादी पार्टी सरकारमध्येही पदोन्नती आरक्षण रद्द करण्यात आलं. एवढच नाही तर १७ ओबीस जातींबाबतही सपा सरकारमध्ये असंवैधानिक काम केलं गेलं.