महाभारतातील महायुद्धाप्रमाणे महा राज्याची सत्ता कुणाच्या हाती सोपवायची हे निश्चित करण्यासाठी इंद्रप्रस्थनगरी स्थित महाराजांनी युद्ध पुकारले. युद्ध म्हटलं की, जिंकण्यासाठी आधुनिक राज्यातील संस्थानिक आप-आपली मांडलिक सरदार शस्त्रासह सैन्य मैदानात उतरवले होतेच. आता निकाल देण्याचे काम लोकांचे असल्याने लोकांना आपलेसे करण्यासाठी प्रेमात आणि युद्धात ज्या पद्धतीने सगळे क्षम्य असते तीच स्थिती यावेळी महायुद्धात दिसली. लक्ष्मीदर्शनाबरोबरच आश्वासनाचा पाऊस पाडला गेला. लोकांचा कौल कुणाचा हे कळाले, सत्ता मिळाल्यानंतर अधिकाराची खुर्ची देण्याचे आश्वासन दिलेल्या एका सेनापतीच्या तुकडीतील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सरदार विजयी झाले. आता त्यांना काही तरी बक्षिस द्यायची वेळ आली. त्यावेळी एकाला मिळाली पाटीलकी, मात्र ती सध्या ओसाड गावची. बघुया ही पाटीलकी तरी नांदती होते का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा