सुहास सरदेशमुख, लोकसत्ता
Already have an account? Sign in
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुरू असणारी तयारी पाहता मराठवाड्यात काँग्रेस अद्याप मागच्या बाकावरच असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत भाजप, तीन शिवसेना आणि एमआयएम असे बलाबल असून काँग्रेस पक्षाचा खासदार मराठवाड्यातून निवडून आला नाही. या वेळी लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यातही काँग्रेसचे नेते फारसे सक्रिय असल्याचे दिसून येत नाहीत. काँग्रेसचा अभ्यास मागच्या बाकावर असल्याचे दिसून येत आहे. जे घडेल ते ‘महाविकास आघाडी’च्या माध्यमातूनच होईल, असे गृहीत धरून भारत जोडो यात्रेनंतरही सारे काही आस्ते कदम असेच चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा >>> सरकारपुढे लाल वादळ थोपविण्याचे आव्हान
मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद तशी अधिक. अशोक चव्हाण
हेही वाचा >>> कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी BRS चं प्लॅनिंग काय? के कवितांनी सांगितलं; म्हणाल्या “अनेक नेते…”
नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार झाले. सध्या भाजपचे वर्चस्व असणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकेल हे ठरलेले नाही किंवा उमेदवारीबाबत कोणतेच संकेत दिले जात नाहीत. मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात असला तरी या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालेले नाही. उमेदवारच नसल्याने औरंगाबादहून विलास औताडे यांना अचानक उमेदवारी देण्यात आली. जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांनी सहा लाख ९८ हजार १९ मते घेत दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसच्या औताडे आणि दानवे यांच्यातील मतांमधील फरक तीन लाख ३२ हजार ८१५ एवढा होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात काँग्रेसचा कोणी बांधणी करणारा नेता दिसून येत नाही.
हेही वाचा >>> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न
ठाकरे गटाशी संघर्ष छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हे नाव बदलण्यात आलेले पूर्वीचे औरंगाबाद