नागपूर : विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. २०१९ च्या तुलनेत या पक्षाच्या २८ जागा वाढल्या. यात सर्वाधिक ९ जागा विदर्भातील आहेत. काँग्रेसचा विचार केला तर पडझडीच्या काळातही काँग्रेसने जिंकलेल्या १६ पैकी ९ जागा विदर्भातील आहेत. त्यामुळे या भागाने मतांचा कौल जरी भाजपला दिला असला तरी काँग्रेसची लाजही राखली आहे.

२०१९ मध्ये भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत ही संख्या २८ ने वाढून १३२ वर वर गेली. वाढीव २८ जागांमध्ये सर्वाधिक ९ जागा या विदर्भातून, ८ जागा पश्चिम महाराष्ट्रातून , पाच जागा ठाणे-कोकणातून व प्रत्येकी तीन जागा मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील आहेत. भाजपची एक जागा मुंबईत कमी झाली आहे. विदर्भात ६२ जागा आहेत.भाजपने ४७ जागी उमेदवार दिले होते. त्यापैकी ३८ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये या पक्षाकडे २९ जागा होत्या. पूर्व विदर्भात भाजपकडे १४ जागा होत्या आता ही संख्या सातने वाढून २१ वर गेली तर पश्चिम विदर्भात १५ जागा होत्या त्यात दोनने वाढ होऊन ती १७ वर गेली.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
BJPs internal disputes in Pune erupted
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश अन् भाजपमध्ये बँनरबाजी ! पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला फ्लेक्स लावून नाराजी व्यक्त
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…

हेही वाचा : राजुऱ्यात काँग्रेस, शेतकरी संघटनेला नव्या नेतृत्वाची गरज! अरुण धोटे, ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, त्यामागे या भागातील ओबीसी मतपेढीवर भाजपने वर्चस्व मिळवले होते. लोकसभा निवडणुकीत हा मतदार या पक्षापासून दूर गेला व त्याचा फटका या पक्षाला बसला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी ही मतपेढी पुन्हा पक्षासोबत जोडण्यासाठी केलेले ‘ डॅमेज कंट्रोल’ यशस्वी झाल्याचे निवडणूक निकालातून दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला फटका

२०१९ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसकडे ४४ जागा होत्या. या निवडणुकीत ही संख्या १६ वर आली. म्हणजे तब्बल २८ जागांचा फटका पक्षाला बसला. गमावलेल्या जागांपैकी सर्वाधिक १० जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहे.मराठवाड्यात सात तर विदर्भातसहा जागा गमावल्या. विदर्भात पूर्वी काँग्रेसकडे १५ जागा होत्या आता ही संख्या ९ वर आली. तरी काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांचा विचार करता त्यात विदर्भाचे योगदान सर्वाधिक ठरते. मुंबईत काँग्रेसला एक जागा मिळाली, मागच्या निवडणुकीत ही संख्या शुन्य होती.

हेही वाचा : फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

शिवसेनेच्या दोन्ही गटाला समान जागा

२०१९ मध्ये एकसंघ शिवसेनेला चार जागा मिळाल्या होत्या. पक्षात फूट पडल्यावर दोन्ही सेनेला प्रत्येकी चार -चाम्जागा मिळाल्या. दोन्ही गटांमिळून शिवसेनेच्या आठ जागा होतात. ठाकरे गटाला मिळालेल्या चार जागांपैकी बाळापूरची जागा त्यांच्याकडे होती ती त्यांनी कायम राखली, एक जागा (मेहकर) शिंदेसेनेकडून तरे एक जागा (दर्यापूर) मैत्रीपूर्ण लढतीत काँग्रेसकडून हिसकावून घेतली. आर्णीची जागा पहिल्यांदाच जिंकली.

लोकसभेच्या अगदी उलट निकाल

लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपचा धुव्वा उडाला होता. फक्त दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीचे निकाल अगदी त्या उलट लागले. शेतमालाच्या भावातील दरघसरणीपेक्षा लाडकी बहीण हा मुद्दा भाजपला साथ देऊन गेला.

हेही वाचा : राज्याच्या इतिहासात सात जणांनी भूषविले एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद !

भाजपच्या वाढलेल्या जागा

विभागजिंकल्यावाढ
पश्चिच महाराष्ट्र२८०८
विदर्भ३८०९
मराठवाडा१९०३
ठाणे१६०५
उत्तर महाराष्ट्र१६०३
मुंबई१५-१ घट
एकूण१३२२८

Story img Loader