चंद्रशेखर बोबडे

पालकमंत्र्यांच्या यादीत विदर्भातील ११ पैकी आठ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे भाजपकडे ठेवण्यात आले आहे. यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा निवडणुका गृहित धरून भाजपने विदर्भावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.विदर्भात एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा, मुनगंटीवार यांच्याकडील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ, वाशीम हे दोन जिल्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जळगावच्या (मराठवाडा) गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आले.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?
Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील नाकाबंदीत मद्यसाठ्यासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
violation of code of conduct in thane
सत्ताधाऱ्यांकडूनच आचारसंहितेला हरताळ? ठाण्यात फलकबाजीला जोर, प्रशासन ढिम्म 

हेही वाचा >>> हुश्य.. सत्तार तर नाहीत ना? औरंगाबादकरांचा सुस्कारा

मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंतची ही व्यवस्था आहे, मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर सध्याचा अतिरिक्त पालकमंत्रीपदाचा कार्यभार संबंधित जिल्ह्यांच्या मंत्र्यांकडे दिला जाईल, असे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र तरीही आता पालकमंत्री नियुक्त करताना दोन्ही गटांना समानसंधी देणे अपेक्षित होते, असे शिंदे गटातील विदर्भाच्या एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजपासह शिवसेनेला धक्का

शिंदे मंत्रिमंडळात फडणवीस, मुनगंटीवार हे भाजपचे तर संजय राठोड शिंदे गटाचे असे एकूण तीन मंत्री आहेत. अकरा जिल्ह्यांचे तिघांमध्ये समान वाटप होणे अपेक्षित होते. पण एकट्या फडणवीस यांना चक्का सहा जिल्ह्यांचे ( नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली,अकोला व अमरावती) पालकमंत्री करणे आश्चर्यकारक आहे. असा प्रकार आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील हा पहिला प्रसंग असावा. भाजपचे दुसरे मंत्री सुधीर मनुगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले. वास्तविक सुधीर मुनगटीवार सुद्धा ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे पूर्व विदर्भातील अन्य जिल्ह्यांचे पालकमंंत्रीपद सोपवता आले असते. २०१४-२०१९ या काळात त्यांनी चंद्रपूरसह वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उत्तमरित्या सांभाळले होते. ठाकरे सरकारच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.

हेही वाचा >>> आजी-माजी खासदारांचा कलगीतुरा अन् भाजपचे ‘मिशन शिरूर’

एकूणच पालक्मंत्री नियुक्त करताना भाजपने विदर्भातील पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहचू नये याची काळजी घेतानाच फडणवीस यांचे महत्व वाढवण्याचाही प्रयत्न केला. अमरावती,अकोला, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात भाजप नेते गडकरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हे येथे उल्लेखनीय.

“ठाकरे सरकारच्या काळात अनेक जिल्ह्यांत कमी निधी देण्यात आला, अनेक योजनांना स्थगिती देण्यात आली होती. तेथे स्थिरस्थावर करण्यासाठी व स्थगिती दिलेल्या योजनांना चालना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद घेतले.शिंदे गटाचा सध्या एकच मंत्री विदर्भात आहे. त्यामुळे इतर ठिकाणचे पालकमंत्रीपद भाजपकडे येणे स्वाभाविक आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर चित्र बदलेल.”– गिरीश व्यास, माजी आमदार, प्रवक्ते भाजप