मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अनुभवाचा मला मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात फायदा झाला होता.. आता माझ्या अडीच वर्षांच्या अनुभवाचा फडणवीस यांना नक्कीच फायदा होईल, असा दावा नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री असताना मी कॉमन मॅन (सीएम) म्हणून काम केले. आता ‘डेडिकेटेड (सर्मपित) कॉमन मॅन’ (डीसीएम) म्हणून काम करणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
Hasan Mushrifs statement regarding post of Guardian Minister of kolhapur
पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायचंय – हसन मुश्रीफ
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

आझाद मैदानावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी त्यांनी रिगल सिनेमा चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव फडणवीस यांनी सुचविले होते. आता मी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले याचा आनंद वाटत आहे. असे सांगून शिंदे यांनी महायुती सरकार हे यशस्वी व गतिमान ठरले आहे. अडीच वर्षांत आम्ही केलेली कामे ही ‘न भूतो न भविष्यति’ आहेत. त्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही ४० आमदार होतो त्याचे ६० झाले आहोत. ही आमच्या कामाची पोचपावती आहे. अडीच वर्षांचे हे सरकार जनतेचे सरकार होते. याचे मला समाधान आहे असे शिंदे यांनी सांगितले

Story img Loader