उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगार-राजकीय पुढारी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये पाऊल ठेवले. या वेळी एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, काही लोकांनी आपल्या पापी वृत्तीने प्रयागराजच्या भूमीला जेरीस आणले होते. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ‘रामचरितमानस’चा दाखला दिला. ते म्हणाले, हे जग कर्माच्या नियमावर चालते. जो जसा वागतो, तशीच क्रिया त्याच्यासोबत होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लुकेरगंज येथील प्रेस ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करीत असताना अतिक अहमदच्या हत्येवर भाष्य केले.
“हे जग कर्माच्या नियमावर चालते. जे पेराल, तेच उगवेल”, अशा शब्दात योगी आदित्यनाथ
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In first visit to prayagraj after atiq killing up cm yogi adityanath quotes ramcharitmanas talks about karma kvg