सतीश कामत

माजी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यात हजेरी लावलेले कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर व महिला संघटक कांचन नागवेकर यांना या पदांवरून हटवत शिवसेनेने नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. मात्र, म्हाप यांच्या जागेवर  उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेले प्रकाश रसाळ‌ यांनी तब्येतीच्या कारणास्तव पद स्वीकारत नसल्याचे पत्र जिल्हाप्रमुखांना पाठवत पक्षनेतृत्वाला धक्का दिला आहे.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

हेही वाचा- ‘एका’चतुर्वेदींनी काँग्रेस बुडवली, ‘दुसरा’सेना संपवणार?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील समर्थकांनी सकाळी पाली येथील निवासस्थानी आणि त्यानंतर रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहातही गर्दी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. 

हेही वाचा- राष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान, संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू होणार

या दौर्‍यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. स्वागताला हजर असलेल्यांपैकी म्हाप, बंदरकर आणि नागवेकर यांना रविवारी पदांवरून हटवत शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांच्या जागी शहरप्रमुख म्हणून प्रशांत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश रसाळ आणि महिला संघटक म्हणून साक्षी रावणंग यांची निवड केल्याचेही जाहीर करण्यात आले. ही कारवाई अपेक्षितच होती. यासंदर्भातील हालचाली दौर्‍यानंतर लगेचच सुरू झाल्या होत्या. नवीन नियुक्तीसंदर्भात स्थानिक जुन्या शिवसैनिकांशी सल्लामसलतही झाली होती. रत्नागिरीतील इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम नावे वरिष्ठांकडे कळविण्यात आली होती. पण त्यापैकी उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेल्या रसाळ यांनी एका पत्राद्वारे पदावर काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. तसा निरोपही जिल्हाप्रमुखांना पाठवला. सकाळी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नियुक्ती नाकारल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.