सांगली : विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड साजराही करता आला नाही, आणि राज्यभर मिरवताही आला नाही. महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली. यात हा विजय दुर्लक्षित ठरला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आमदार पाटील यांना पुन्हा नव्याने राजकीय मांडणी केली तरच जिल्ह्यात खचलेला नेतृत्वाचा शिरपेच डोईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांचे वाढलेले बळ भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोलाचे भांडवल तर ठरणार आहेच, पण आमदार पाटील यांना आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद अबाधित ठेवण्यासाठी अधिक जागृत राहावे लागणार असे दिसते.

इस्लामपूरला यावेळी राज्याचे सर्वोच्च पद मिळणारच अशी भाबडी आशा इस्लामपूरकरांनाच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्याला होती. महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक रिंगणात उतरणार असे दिसत होते. मात्र, आपला-तुपला अशी गटबाजीची सवय झालेल्या जिल्ह्यातील राजकारणात यावेळची विधानसभा निवडणूकही अपवाद ठरली नाही. आमदार पाटील यांना मतदारसंघातच अडकवून प्रचारासाठी राज्यभर जाता येणार नाही अशी व्यूहरचना महायुतीने यावेळी केली होती. गेल्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून गौरव नायकवडी आणि अपक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील हे होते. युती धर्मानुसार त्यांच्यावर भाजपकडून कारवाईही करण्यात आली होती. मात्र, पुन्हा भाजपने त्यांना सन्मानाने जिल्हाध्यक्ष करून कारवाई खुंटीला टांगली. आजपर्यंत विरोधकामध्ये ऐक्याचा अभाव असल्याने आमदार पाटील यांना प्रत्येक निवडणूक सोपी होती. लाखाचे मताधिक्य कायम राखत आलेल्या आमदार पाटील यांचे यावेळी एकसंघ विरोधकामुळे मताधिक्य लाखाचे बारा हजार झाले. सोयीचे राजकारण यावेळी मात्र फारसे मदतीला आले नाही ही वस्तुस्थिती आता तरी ध्यानी घ्यायला हवी आहे.

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा – Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

यावेळी आमदार पाटील यांचे मताधिक्य केवळ साडेतेरा हजारापर्यंत रोखण्यात महायुतीला यश आले आहे. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांना विश्‍वासात न घेता प्रचारात मानसन्मान न देता त्यांना गृहित धरून प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित केली जात होती. गेल्या सात निवडणुकीत हे प्रकार खपून गेले. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इस्लामपूरची निवडणूक मनावर घेतली होती, त्याला अर्थात साथ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूरची जागा मित्रपक्षाला देत असताना उमेदवारही उसनवारीवर दिला. भोसले-पाटील यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवित असताना स्थानिक पातळीवर असलेल्या महायुतीतील विरोधकांनाही चार खडे बोल सुनावून यावेळी गमजा चालणार नाहीत असा इशारा दिला होता. यामुळे महािउक गटासह विक्रम पाटील, आमदार सदाभाऊ खोत, केदार पाटील आदी मंडळी आपल्या घरचेच काम आहे या पद्धतीने कार्यरत झाले. या उलट आमदार पाटील गट अतिआत्मविश्‍वासाच्या भरवशांवर गाफील राहिला. आष्ट्यामध्ये भाजप वासीय झालेल्या वैभव शिंदे यांना आमदार पाटील यांनी जिल्हा बँकेत संधी देऊन बेरजेचे राजकारण केले असले तरी आष्ट्याने फारशी साथ दिली नाही हे उपलब्ध मतावरून दिसते. मिरज तालुक्यातील गावामध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून निर्माण झालेला संशय दूर करण्यात यश आले नाही. यामुळे वसंतदादा घराण्याला दूर करण्याचा प्रयत्नही मताधिक्य कमी करण्यात हातभार लावणारे ठरले.

हेही वाचा – मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन

आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. इस्लामपूर नगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आमदार पाटील यांच्या गटाची कसोटी लागणार आहे. जे अवती भोवती कार्यकर्ते आहेत ते आता उपयुक्त किती याची चाचपणी करायला हवी. केवळ सहकारी संस्था ताब्यात आहेत, म्हणजे सगळा मतदारसंघ ताब्यात आहे असे समजण्याचे दिवस आता कालबाह्य झाले. शिराळा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यामुळे आमदार पाटील यांचे तालुक्यावर एकहाती असलेल्या वर्चस्वाला तडे गेले आहेत हे मात्र निश्‍चित.

Story img Loader