वर्धा : वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी या जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमके चित्र स्पष्ट नसून मतदार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. वर्धा मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, आघाडीचे शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे यांच्यासह अपक्ष रवी कोटंबकार, विलास कांबळे, बसपचे विशाल रामटेके यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. भोयर यांचा तिसऱ्यांदा शेंडेंसोबत सामना होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक, अशी भावनिक साद; की भोयर यांची विकासकामे, यापैकी कोणास पसंती मिळणार, हीच चर्चा. पण पावडे त्यांचा बेरंग करणार, असाही मतप्रवाह येथे आहे.

देवळीत युतीचे राजेश बकाने विरोधात आघाडीचे रणजित कांबळे, या दुहेरी लढतीस शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी छेद दिला आहे. कांबळे पराजित होवू शकत नाही, हा दावा कायमचा यावेळी खोडून काढू, असे भाजप नेते म्हणतात. यासाठी भाजपने सर्व ती ताकद पणाला लावल्याने आमदार कांबळे यांना लढत सोपी राहिली नाही. येथील लढत जोरदार असल्याचे काँग्रेस नेतेच सांगतात.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शिर्डीतल्या एकाच इमारतीत ७ हजार मतदार वाढले? काँग्रेसच्या आरोपात किती तथ्य?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Budget 2025 Bihar National Institute of Food Technology
निवडणूक वर्षात बिहारवर पुन्हा खैरात
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 

हेही वाचा >>> मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?

आर्वीने तर उभ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदार पत्नी मयूरा अमर काळे यांच्याविरोधात युतीचे सुमित वानखेडे, असा थेट सामना येथे आहे. काळे विरोधात भाजपच नव्हे तर त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे इच्छुक व इतर बहिष्कार टाकून बसले आहेत. म्हणून ही लढाई काळे यांना सोपी राहिली नाही. आपल्या प्रचाराच्या शेवटच्या भाषणात त्यांनी वानखेडेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याची बाब चर्चेत आहे. माझी लढाई कुणाशी, हे दाखवून घराणेशाहीची टीका झाकायची व सहानुभूती मिळवायची, असा हेतू साध्य होणार का, हे पुढेच दिसेल. कारण दोन्ही प्रमुख उमेदवार प्रथमच रिंगणात आहेत. हिंगणघाट मतदारसंघात युतीचे आमदार समीर कुणावार, आघाडीचे अतुल वांदिले व बंडखोर राजू तिमांडे यांच्यात मुख्य लढत आहे. तिमांडे यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यवार पडणार, याची मतदारच खुली चर्चा करीत असल्याने निकालाचे आश्चर्य वाटणार नाही, असे नेतेमंडळी बोलतात. जिल्ह्यात अलीकडच्या काळात भाजपने भक्कम पाय रोवले. शंभर टक्के भाजपमय करणार, हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दावा असल्याने आघाडी सतर्क आहे.

Story img Loader