Bihar Politics: बिहारमधील दरभंगा येथे दोनदिवसीय बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या बिहार यूनिटने रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत परत कधीच आघाडी न करण्याचा ठराव मंजूर केला. राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी ठरावास दुजोरा देत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय भाजपा नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की, भाजपा परत कधीच नितीश कुमारांसोबत आघाडी करणार नाही.”

सुशील मोदी यांनी हेही सांगितले की, “भाजपा आणि जनादेशाचा वारंवार विश्वासघात करणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणात ओझं बनले आहेत. त्यांच्याकडे जनाधार नाही आणि मत मिळवण्याची क्षमता. त्यांची कुवत आता विधासभेत १०-१५ जागा जिंकण्याचीही राहिलेली नाही.”

dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग

“जदयूला २०२०च्या विधानसभा निवडणुकीत ४३ जागा यामुळे जिंकता आल्या, कारण भाजपाने आपली संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान मोदी स्वत: बिहारमध्ये येऊन प्रचार करत होते. पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांसाठी मतं मागितली नसती, तर स्वबळावर त्यांच्या पक्ष लोकसभेच्या १५ नाही केवळ दोन जागाच जिंकला असता. भाजपा आता राजकीय ओझं मुक्त झाल्याचा अनुभव घेत आहे आणि आनंदी आहे की ते सोडून गेले. आता भाजपा स्वत:च्या बळावर २०२५ मध्ये बिहारमध्ये सरकार बनवेल.” असंही सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं.