मुंबई : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्याने सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून शपथविधीची तारीख जाहीर होणे आणि प्रशासनाकडून शपथविधीची तयारी आणि निमंत्रणपत्रिका काढण्याची नवी प्रथा राज्यात रूढ झाली आहे. राज्यपालांच्या परवानगीशिवाय असे प्रकार घडणे हा राज्यपालांचाच अवमान असल्याची चर्चा बुधवारी राजकीय वर्तुळात सुरू होती.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपविधी गुरुवारी आझाद मैदान येथे पार पडणार आहे. भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दुपारी तीन- साडेतीन वाजण्याच्या सुमारास राजभवनावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Changes in traffic in central city Pune print news
पुणे: शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत आज बदल

हेही वाचा >>> आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल

त्या वेळी राज्यपालांनी फडणवीस यांचा सरकार स्थापनेचा दावा मान्य करीत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता शपथग्रहण सोहळा आयोजित करण्याचे आदेश प्रशासनास दिले.

नियम आणि संकेतानुसार विधिमंडळाच्या नेत्याने सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतरच राज्यपालांच्या सूचनेनुसार सरकारच्या शपथविधीची तयारी केली जाते. मात्र राज्याच्या इतिहासात या वेळी प्रथमच राजभवनातून नव्हे तर चक्क भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर केले. त्यानंतर मंत्रालयातून प्रशासनही कामाला लागले आणि फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यापूर्वीच शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली. आणि फडणवीस यांच्या शपथविधीच्या निमंत्रणपत्रिकाही रवाना झाल्या होत्या. विशेष म्हणजे या निमंत्रणपत्रिकेत फडणवीस यांच्या आईच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला. असून ही निमंत्रणपत्रिका सकाळीच समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.

Story img Loader