राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उदयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुन्हेगारीवर भाष्य केलं आहे. बलात्कारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं मुंडण करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढावी, तेव्हाच हे बलात्कारी आहेत, हे सर्व जनतेला कळेल. तसेच यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल, असं विधान गेहलोत यांनी केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारची अग्निवीर योजना, पेपरफुटी आणि कर्जमाफीवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

यावेळी गेहलोत म्हणाले की, कठोर कारवाई केल्यास इतर गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना हातकडी लावू नये, असे आदेश दिले आहेत. पण लोकांना हातकडी घातली तर त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, यामुळे गुन्हा करताना घाबरतील. न्यायव्यवस्था आपलं काम करते, आपण आपलं काम करायचं. न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था असते. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे, आपले कर्तव्य आहे, असंही गेहलोत म्हणाले.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

गेहलोत यांची अग्निवीर योजनेवर जोरदार टीका

केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, अग्निवीर योजनेवर सुरुवातीपासूनच बरीच टीका होत आहे. कोणाशीही चर्चा न करता केंद्र सरकारने अचानक ही योजना जाहीर केली. अग्निवीर योजनेविरोधात आंदोलन केल्यास आम्ही गुन्हा दाखल करू… यानंतर तुम्हाला आयुष्यभर नोकरी मिळणार नाही, अशी धमकी केंद्र सरकारकडून देण्यात आली. कारवाईच्या भीतीने लोक शांत झाले. अशा प्रकारे धमक्या देऊन लोकांना शांत करणे योग्य नाही, असे मला वाटते, असंही गेहलोत म्हणाले.