छत्रपती संभाजीनगर : जालना लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यांनतर त्याचे चरंजीव संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून तर त्यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीमध्ये घेण्यात आला आहे.कन्नड लोकसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

कन्नड मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होते. २०१४ मध्ये हषर्वधन जाधव यांनी या मतदारसंघातून ६२ हजार ५४२ मते घेऊन विजय मिळवला होता. तेव्हा उदयसिंह राजपूत यांना ६० हजार ९८१ मते मिळाली होती. ‘ धनुष्यबाण ’ चिन्ह मिळाल्यानंतर आपण विजयी झालो, या भावनेतून शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतरही उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे ‘ निष्ठावंत’ अशी उपाधी लावत शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला. २००४ पासून अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लक्षणीय मते मिळविणाऱ्या उदयसिंह राजपूत यांच्यासमोर आता संजना जाधव यांचे आव्हान उभे असणार आहे.

Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
election
आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Jayashree Shelke
Buldhana Assembly Constituency: शिवसेनेचे साडेतीन दशकांत प्रथमच स्त्री-दाक्षिण्य!
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>Buldhana Assembly Constituency: शिवसेनेचे साडेतीन दशकांत प्रथमच स्त्री-दाक्षिण्य!

या मतदारसंघावर अनेक वर्ष रायभान जाधव यांचा वरचष्मा होता. राजकीय पटलावर रायभान जाधव यांच्या शब्दाला मान होता. पुढे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव यांनीही या मतदारसंघात विजय मिळवला. ते एकवेळा मनसेचे आमदार होते. रायभान जाधव यांच्या नावाने आघाडी करुन त्यांनी राजकारण केले. याच काळात संजना जाधव यांना एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होत्या. आता त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे.

Story img Loader