मुंबई : विधानसभेच्या २०१७च्या निवडणुकीत भाजपला पाटिदार पटेल समाज, व्यापारी, शेतकरी यांचा नाराजीचा फटका बसला होता. भाजपला आमदारांच्या संख्येचा तिहेरी आकडाही गाठता आला नव्हता. पण गेल्या पाच वर्षांत भाजपने आधीच्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या. आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा पटेल समाजाला लाभ झाला आणि या समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले. आदिवासी बहुल भागावर लक्ष केंद्रित करून तेथे मोठय़ा प्रमाणावर सरकारी योजना राबविण्यात आल्या. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळेल याकडे लक्ष दिले. या साऱ्यांचा भाजपला फायदा झाला. तसेच मतांच्या ध्रुवीकरणाचा नेहमीचा खेळही भाजपला फायदेशीर ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमध्ये १९८५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी ‘खाम’चा (क्षत्रिय, आदिवासी, हरिजन आणि मुस्लीम) प्रयोग केला होता. काँग्रेसला त्याचा राजकीय फायदा झाला आणि पक्षाने १४९ जागा जिंकल्या होत्या. यातून १५ टक्क्यांच्या आसपास मतदार असलेला पाटिदार पटेल समाज काँग्रेसपासून दुरावला आणि त्याचा भाजपला फायदा झाला. तेव्हापासून पटेल समाज हा भाजपचा हक्काचा मतदार झाला. पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन झाले. आंदोलनाला हिंसक बळण लागले आणि १४ जणांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला होता. २०१७च्या निवडणुकीत भाजपला पटेल समाजाच्या नाराजीचा मोठय़ा प्रमााणावर फटका बसला. कारण पटेल बहुल सौराष्ट्रात काँग्रेसने अधिक जागा जिंकल्या होत्या. केंद्रातील भाजप सरकारने १०३व्या घटना दुरुस्तीनुसार आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला १० टक्के आरक्षण लागू केले. या घटना दुरुस्तीनंतर आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला आरक्षण देणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले. पटेल समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record success for bjp due to good strategy gujrat election ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST