नागपूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर नव्याने संघटन बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने आता राज्यातील पक्ष वाढीची जबाबदारी पुन्हा विदर्भातील नेत्यांकडेच येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ १६ आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाला. काँग्रेसला ज्या १६ जागांवर विजय मिळाला, त्यापैकी नऊ जागा विदर्भातील आहेत. यामध्ये अकोला पश्चिममधून साजिद खान पठाण, रिसोड अमित झनक, उमरेड संजय मेश्राम, पश्चिम नागपूर विकास ठाकरे, नागपूर उत्तर नितीन राऊत, साकोली नाना पटोले, आरमोरी रामदास मसराम, ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार, यवतमाळ अनिल ऊर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे विदर्भातील अमरावती, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच ठिकाणी खासदार आहेत.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस

हेही वाचा >>>बावनकुळे, शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी कायम; मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा सुरू

राज्यात काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची संख्या विदर्भात अधिक आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार देखील विदर्भातून गेले आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आवश्यक रसद येथूनच मिळू शकते.त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी पटोले आणि वडेट्टीवार यांच्यावरच पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.

आम्हाला विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही. हा जनतेचा कौल नाही, ‘ईव्हीएम’ची कमाल आहे. निवडणूक मतपत्रिकेवर झाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन उभे करणार आहोत. सोबतच पक्ष वाढीसाठी राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मिळून प्रयत्न करू.-अतुल लोंढेमुख्य प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस.

Story img Loader