राजस्थानमधील सिंहासनाच्या खेळामध्ये अशोक गेहलोत यांनी शांतीकुमार धारिवाल यांच्यावर त्यांच्या ९० पेक्षा जास्त निष्ठावान आमदारांसह विश्वास ठेवण्याचेही एक कारण आहे. ते गेहलोत यांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी आहेत. रविवारी, आमदारांनी धारिवाल यांच्या अंगणात तळ ठोकला, अशा प्रकारे गेहलोत यांचा मुख्यमंत्री म्हणून उत्तराधिकारी ठरवण्यासाठी बोलावलेल्या अधिकृत सीएलपी बैठकीची हवा काढून टाकली.

आपल्या आदरातिथ्याने, कोटा उत्तर येथील ७८ वर्षीय आमदाराने पुन्हा एकदा दाखवून दिले की ते गेहलोत यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक मानले जातात, अगदी त्यांच्या वतीने ते हायकमांडला सामोरे जाण्यास तयार आहेत. काँग्रेसचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन सीएलपीची बैठक घेण्यासाठी वाट पाहत राहिले मात्र ते सोमवारी परत आले. कारण पक्षाचे आमदार धारिवाल यांच्या घरी थांबले होते आणि नंतर त्यांनी सभापती सी पी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

सीएलपी बैठक रविवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होती. बैठक नियोजित वेळेप्रमाणे सुरू होणार नाही याचा पहिला संकेत संध्याकाळी तंबू, खुर्च्या आणि पंखे धारीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले तिथूनच मिळाला. धारीवाल यांच्या घरातील व्हिडिओंवरून त्यांची निष्ठा कोठे आहे हे स्पष्ट झाले. “राजस्थान सरकारने सुरू केलेल्या महान योजनांचा फायदा जर कोणी घेऊ शकत असेल तर तो फक्त अशोक गेहलोत आहे. ही (मुख्यमंत्री) खुर्ची बदलली, अशोक गेहलोत बदलले, तर पुढच्या माणसाला त्याचा फायदा करून घेता येणार नाही आणि काँग्रेसचे नुकसान होईल. म्हणूनच अशोक गेहलोत कोणत्याही प्रकारे टिकून राहावेत, अशी आमची इच्छा आहे” असे धारीवाल म्हणाले.

धारीवाल यांच्या घरातील व्हिडिओंवरून त्यांची निष्ठा कोठे आहे हे स्पष्ट झाले. “राजस्थान सरकारने सुरू केलेल्या महान योजनांचा फायदा जर कोणी घेऊ शकत असेल तर तो फक्त अशोक गेहलोत आहे. ही (मुख्यमंत्री) खुर्ची बदलली, अशोक गेहलोत बदलले, तर पुढच्या माणसाला त्याचा फायदा करून घेता येणार नाही आणि काँग्रेसचे नुकसान होईल. म्हणूनच अशोक गेहलोत कोणत्याही प्रकारे टिकून राहावेत, अशी आमची इच्छा आहे,” धारीवाल म्हणाले.

गेहलोत यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी सीएलपीची बैठक बोलावल्याबद्दल आणि एक माणूस, एक पदाच्या तत्त्वानुसार त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा असल्याचा संदेश दिल्याबद्दलही त्यांनी हायकमांडला प्रश्न विचारला आहे.“हायकमांडमधील कोणीही मला सांगा की आज अशोक गेहलोत यांच्याकडे कोणती दोन पदे आहेत ज्यांचा तुम्ही राजीनामा मागत आहात? त्यांच्याकडे एकच पद आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री. त्यांना दुसरे पद मिळाले की मग चर्चा रंगते. आज असं काय झालंय की तुम्ही त्यांचा राजीनामा मागायला तयार होता आहात? या संपूर्ण कटाची किंमत (आम्हाला) पंजाब (ज्यामध्ये अमरिंदर सिंग यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा संदर्भ वाटत होता) आणि आता राजस्थानही गमावले जाईल. आपण सतर्क राहिलो तर राजस्थान वाचेल. आपण सावध राहिलो तर राजस्थान वाचेल, अन्यथा राजस्थानही आपल्या हातातून निसटून जाईल असे” धारीवाल म्हणाले.

गेल्या वर्षीही धारीवाल यांनी राज्यातील नेतृत्व बदलाबाबत आपले मत स्पष्ट केले होते. व्हायरल झालेल्या एका छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये, पत्रकारांनी माकन यांना संघटनेतील बदलांबद्दल पक्षाच्या आमदारांकडून अभिप्राय घेण्याबाबत विचारले असता, त्यांनी प्रतिउत्तर दिले: “कौन कर रहा है बदल? कौन कर रहा है बदल? यहाँ तो अशोक गेहलोतजी हैं जो कुछ हैं.