रत्नागिरी : राज्य शासनाच्या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना पालकमंत्री पदावर डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा उदय सामंत यांना देण्यात आले आहे. मात्र आमदार योगेश कदम यांना कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना डावळल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार निवडून आले होते. त्यामध्ये दापोली खेड  विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम हे पुन्हा आमदार झाले. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद यापूर्वी देखील आमदार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले होते. यावेळी देखील हे पद आमदार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्री पदे देण्यात आली. त्यामध्ये आमदार उदय सामंत यांना पुन्हा उद्योग मंत्री पद देण्यात येऊन त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पदी देण्यात आले. तसेच दापोली खेड मतदार संघातील आमदार योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पद देण्यात आले. या मंत्रीपदानंतर आमदार योगेश कदम यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा दापोली खेड  विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आमदार योगेश कदम यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>शिवसेनेच्या विरोधानंतरही मुलीसाठी पालकमंत्रीपद मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी…

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमदार योगेश कदम पालकमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे वक्तव्य यापूर्वी केले होते. तसेच आमदार उदय सामंत  एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद उदय सामंत यांनीच स्वीकारावे, असे सांगितले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आमदार योगेश कदम हे पालकमंत्री पदाच्या शर्यतेतून बाहेर असल्याचे लक्षात आणून देण्याचे काम आमदार उदय सामंत यांनी केले होते. मात्र या वेळच्या सरकारमध्ये मंत्री योगेश कदम यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असताना त्यांना पालकमंत्री पदापासून डावळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या डावळण्यात आलेल्या पालकमंत्री पदाबाबत माजी आमदार रामदास कदम आणि राज्यमंत्री आमदार योगेश कदम कोणता निर्णय घेतात याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader