नागपूर: पहलगाम हल्ल्याची घटना ही केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची सपशेल चूक असल्याचे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने अनपेक्षितपणे जात निहाय जनगणना करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्ष या निर्णयाचे स्वागत का करीत नाही? असा सवाल केला? महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला केंद्राच्या निर्णयाचे अभिनंदन करायला लावणारे बावनकुळे ज्यांच्यामुळे ते मंत्री आहेत त्या लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याचे मानधन मिळाले नाही तरी ते त्यावर काहीच बोलत नाही,ते गप्प का? त्याबाबत ते सरकारचा निषेध करणार का ? असा प्रतिसवाल विरोधीपक्षाने केला आहे.

भाजप प्रदेशाध्क्षपदाची ऐक परंपरा आहे. हे पद नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी भूषवले असून गडकरी सध्या केंद्रीय मंत्री आहेत. मुंडे उपमुख्यमंत्री, नंतर केंद्रात मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती. देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकत राहणे ही वरील नेत्यांची खुबी होती.पण ते करताना त्यांनी पक्ष आणि पातळी सांभाळली होती. बावनकुळे याला अपवाद आहेत. त्यांनीच पक्षाचे प्रवक्ते नियुक्त केले असले तरी ते नागपुरात असले तर रोज माध्यमांपुढे जातात.

तशी व्यवस्था त्यांनी केली आहे. अनेकदा या मुळे ते अडचणीत येतात. तसाच प्रकार जातनिहाय जनगणा या केंंद्राच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया देताना केलेले भाष्य होय. बावनकुळे याच्या कार्यालयातर्फे पाठवण्यात आलेल्या निवेदनात ते म्हणतात “मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचे औदार्य शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले-वडेट्टीवार दाखवणार का ? असा सवाल बावनकुळे यांनी केला होता.जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत राजकारण करणार? असा थेट सवाल बावनकुळे यांनी या निवेदनात केला होता.या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याचे मानधन का मिळाले नाही, यावर का बोलत नाही असा सवाल केला.

बावनकुळेंनी लाडक्या बहिणींच्या मानधावर बोलावे -काँग्रेस

जात निहाय जनगणना करण्याला संघ व भाजपचा विरोध होता व काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्येक व्यासपीठावर ही मागणी लावून धरत होते. तेव्हा भाजपच कधी सार्वजनिक सभेत तसेच संसदेत त्यांचा अपमान करीत होती, आता त्यांचीच् मागणी भाजपने मान्य केली. हा केंद्राचा प्रश्न आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे भाजप व मेत्र पक्ष सत्तेत आले आहे. त्यांनी त्यांचे मानधन २१०० रुपये करू असे आश्वासन दिले होते.बावनकुळे मंंत्री आहेत त्यांनी मानधन वेळेवर मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. एप्रिल महिन्याचे मानधन मे महिना सुरू झाला तरी मिळाले नाही. त्यावर बावनकुळे काहीच का बोलत नाही, असा सवाल शहर काँग्रेसचे प्रवक्ते अभिजित झा यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बावनकुळेंनी अभ्यास करावा -आर्य

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी बावनकुळे यांनी अभ्यास करायला हवा. जात निहाय जनगणनेची मागणी भाजपने कधीच केली नव्हती. ती विरोधी पक्षाची मागणी होती. ती भाजप प्रणित केंद्र सरकारला मान्य करावी लागल हा विरोधकांचा विजय आहे, त्या साठी मोदींचे अभिनंदन करण्याचा प्रश्नच उरत नाही. उलट लाडकी बहीण योजना भाजप समर्तिक ऐकनाथ शिंदे सरकारने केली होती.तिची अंलबजावणी करणे सरकारचे काम आहे. कारण भाजप सत्तेत आलीच या योजनेमुळे. जर सरकार या महिलांना दर महिन्याला त्यांचे मानधन देत नसेल तर ते सरकारचे अपयश आहे. पालकमंत्री म्हणून बावनकुळे गप्प आहे व नाकह विरोधी पक्षाच्या राष्टीय नेत्यांवर आरोप करीत आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी दिली.