नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केलेल्या ( ‘ कधी कधी असे वाटते की राजकारण सोडून द्यावे’) ‘ प्रतिक्रियेचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी यांच्या सत्कार सोहळ्यात गांधी यांच्या समाजकारणाचा परिचय करून देताना गडकरी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. ‘कधी कधी असे वाटते की,राजकारण सोडून द्यावे’. केंद्र सरकारमधील गडकरी यांचे स्थान लक्षात घेता गडकरी यांचे मत महत्त्वाचे ठरते. राज्यातील सत्तांतरात भाजपचा असलेला सहभाग लपून राहिला नाहीं. यातून भाजपची सत्तालालसा उघड झाली. तसेच केंद्राकडूनही विरोधकांना संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हेही लपून राहिलेले नाही. त्यामुळेच गडकरी यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा रोख केंद्रातील नेतृत्वाविरुद्ध आहे की, राज्यातील भाजप नेत्यांविरूध्द, या मुद्द्यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… मराठवाड्यातील लातूर व परभणीत मुख्यमंत्र्यांकडून समर्थकांचा शोध

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Through quitting politics statement nitin gadkari pointing at someone print politics news asj
First published on: 27-07-2022 at 16:19 IST