संतोष प्रधान राज्याचे १९ वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला. पाच वर्षांचा कायर्काळ पूर्ण होण्यापूर्वी पायउतार झालेले ठाकरे हे आणखी एक मुख्यमंत्री ठरले. वसंतराव नाईक व देवेंद्र फडणवीस या दोघांनीच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अन्य १७ मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक यांनी सर्वाधिक ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदी दीड वर्षे मिळाली होती. विलासराव देशमुख यांनी आठ वर्षे, शरद पवार यांनी सुमारे सात वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी भूषविले. शरद पवार यांनी चार वेळा तर विलासरावांनी दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. शंकरराव चव्हाण यांची दोनदा मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती आणि त्यांनी सव्वा चार वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यांचे पूत्र अशोक चव्हाण यांना जवळपास दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री व त्यांचा कायर्काळ - यशवंतराव चव्हाण - अडीच वर्षेमारोतराव कन्नमवार - एक वर्षवसंतराव नाईक - ११ वर्षेवसंतदादा पाटील - सव्वातीन वर्षेबॅ. ए. आर. अंतुले - सव्वावर्षबाबासाहेब भोसले - एक वर्ष एक महिनाशिवाजीराव निलंगेकर पाटील - २८२ दिवससुधाकरराव नाईक - दीड वर्षेमनोहर जोशी - चार वर्षेनारायण राणे - २५९ दिवसविलासराव देशमुख - आठ वर्षेसुशीलकुमार शिंदे - पावणे दोन वर्षेअशोक चव्हाण - दोन वर्षेपृथ्वीराज चव्हाण - पावणेचार वर्षेदेवेद्र फडणवीस - पाच वर्षेउद्धव ठाकरे - अडीच वर्ष