कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री के. वेंकटेश यांनी गोहत्या कायद्याविरोधात केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने आंदोलन पुकारण्याचे आवाहन केले आहे. गोहत्येवरून सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सावध पवित्रा घेत सांगितले की, या विषयावर अद्याप मंत्रिमंडळात चर्चा होणे बाकी आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, कायद्यात सुधारणा करावी की नाही, याचा निर्णय मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पशूधन कत्तल विरोध आणि पशूधन सरंक्षण कायदा, १९६४ चा हवाला देऊन सिद्धारामय्या म्हणाले की, १२ वर्षांवरील भाकड गाई आणि शेतीयोग्य नसलेल्या पशूधनाची कत्तल करण्याची मुभा या कायद्याद्वारे मिळाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपाने या कायद्यात एकदा दुरूस्ती केली. आम्ही विरोध करून मुळ तरतुदी कायम ठेवण्यास सांगितल्या होत्या. तरी त्यांनी कायद्यात बदल केला. आता या विषयावर आम्ही मंत्रिमंडळात चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पशुसंवर्धन मंत्री के. वेंकटेश यांनी मागच्या आठवड्यात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन केले. वेंकटेश मागच्या आठवड्यात म्हणाले होते की, भाजपाने बैल आणि म्हशींच्या कत्तलीला परवानगी दिली. पण गाईंच्या कत्तलीवर बंदी आणली. जर बैल आणि म्हशींची कत्तल होऊ शकते तर गाईंची का नाही?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the karnataka government allow the slaughter of cows as bjp protests siddaramaiah says cow slaughter to be discussed kvg
First published on: 05-06-2023 at 20:48 IST