उशिराने उपचारांसाठी जाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

पिंपरी : करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या िपपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या आता दोन हजारांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आणि करोनामुक्तांची संख्या वाढत असली तरी, गेल्या सहा महिन्यांपासून मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे.

शहरातील करोनाचा पहिला बळी १२ एप्रिलला झाला. पहिल्या चार महिन्यात (२६ ऑगस्टपर्यंत) करोनामुळे शहरात झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून अधिक झाली होती. १२ ऑक्टोबपर्यंत आणखी एक हजार रुग्णांच्या मृत्यूची भर पडली आहे. पिंपरी पालिकेच्या आकडेवारीनुसार, पहिल्या हजार मृतांमध्ये ८२५ प्रत्यक्ष शहरातील रहिवासी होते. तर, १६९ मृत हद्दीबाहेरचे होते. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार होत होते. सोमवारी (१२ ऑक्टोबर) मृतांच्या संख्येने दोन हजाराचा आकडा ओलांडला, तेव्हा १४४१ इतके शहरातील रहिवासी आहेत. तर, ५६६ हद्दीबाहेरचे आहेत. १९ एप्रिलला एकाच दिवशी सर्वोच्च ४१ मृतांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर, २६ सप्टेंबरला एकाच दिवशी ६५ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक दिवस दररोज २० ते २५ दरम्यान मृत्यू होत होते. अलीकडचे काही दिवस मात्र मृत्यूंची संख्या कमी झालेली दिसते.

शहरातील मृत्युदर कमी आहे. यापुढील काळातही मृत्यूचे प्रमाण कमी होत जाईल. करोनाबाधित रुग्ण खूपच उशिराने उपचार सुरू करतात, ही मोठी अडचण आहे. तेव्हा आपल्या हातात काहीच राहत नाहीत. त्याकरिता नागरिकांनी वेळेत आरोग्य तपासणी करावी, चाचण्यांना सामोरे जावे. वेळीच उपचार घ्यावेत. घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारी घ्यावी.

– डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, िपपरी पालिका