केसरी वाडा गणपती पुण्यातला मानाचा पाचवा गणपती आहे. लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात गणेशोत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव यांचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरुन जाते. मात्र केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरुन जाऊन विसर्जित होतो. लोकसत्ताच्या 'तू सुखकर्ता' या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण केसरी वाडा गणपतीचा इतिहास तसंच महत्त्व जाणून घेणार आहोत. पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.