बुरशी, जीवाणू संसर्गाचा धोका, दुर्लक्ष नको - तज्ज्ञांचे आवाहन पुणे : पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ आणि कोरडे न के ल्यास कानांमध्ये बुरशी तसेच जीवाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कानाच्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा, ऐकायला येणे कमी झाले असता किं वा कानातून पाणी येत असता त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. पावसाळ्यात दिसणाऱ्या नियमित आजारांमध्ये कानांना होणाऱ्या संसर्गाचा समावेश आहे. कानाची आतील बाजू किं वा बाहेरील भागात होणारा बुरशीचा संसर्ग आणि वातावरणातील वाढलेल्या आद्र्रतेमुळे जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता असते. कानातील मळ किं वा तो स्वच्छ करण्यासाठी कापसाच्या काडय़ा (बड्स) वापरल्यामुळेही संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे कानांच्या तक्रारी दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पूर्वा लुनावत म्हणाल्या, कान दुखणे, ऐकू कमी येणे, कानातून पाणी येणे, चक्कर येणे, तीव्र डोके दुखी किं वा ताप अशी लक्षणे दिसतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळ्याची नियमित सुरुवात होण्याआधीच असे रुग्ण येत आहेत. कान स्वच्छ करण्यासाठी टोकदार वस्तूचा वापर टाळणे, अंघोळ तसेच पोहण्याचा व्यायाम केल्यानंतर कान पुसून कोरडे करणे, गाणी ऐकण्याचे ‘हेडफोन’ नियमित स्वच्छ ठेवणे या सवयी संसर्गापासून रोखण्यास मदत करू शकतात. कानाचा संसर्ग औषधांनी बरा न झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते. काय काळजी घ्याल? ’ कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा ’ गाणी ऐकण्याचे हेडफोन वेळोवेळी निर्जंतुक करा ’ कान स्वच्छ करण्यासाठी टोकदार वस्तू वापरू नका ’ अंघोळ, पोहोण्यानंतर कान पुसून कोरडे करा ’ कान दुखणे, पाणी येणे या लक्षणांवर डॉक्टरांचा सल्ला घ्या कानातील बुरशी किं वा जंतुसंसर्गाला ‘ऑटोमायकॉसिस’ असे म्हणतात. पावसाळ्यात कानात ओलावा राहिला असता बुरशी किं वा जीवाणू संसर्गाचा धोका वाढतो. असा संसर्ग झाल्यास पाच दिवस औषधोपचार, त्यानंतर कान स्वच्छ करून बुरशी काढून टाकणे या गोष्टी कराव्या लागतात. पावसाळ्यात थंड पेयांचे सेवन के ल्यास घशाचा संसर्ग होतो. कान आणि घशाला जोडणारी ‘युस्टेशियन टय़ूब’ बंद झाली असता कानावर संसर्गाचा थेट परिणाम होतो. त्यामुळे पावसाळी हवेत घशाचे विकार ओढवू नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. देवयानी शिंदे