देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसत असून देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. राज्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल, गेट वे ऑफ इंडिया याठिकाणी विद्युत रोषणाईची झगमग पाहायला मिळत असताना मावळ तालुक्यातील धबधबा तीन रंगात वाहताना दिसला.

lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

मावळ तालुक्यातील भाजे लेणी येथील धबधब्याला तिरंग्याच रूप देण्यात आलं होत. स्वातंत्र्यदिनानिमित्त धबधबा परिसरात बंदोबस्तासाठी तैणात  पोलिसांच्या कल्पनेतून  धबधबा तीन रंगात वाहताना दिसला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कल्पनेला पर्यटकांनीही दाद दिल्याचे पाहायला मिळाले. तीन रंगात वाहणाऱ्या धबधब्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात पर्यटक दंग झाले होते.

तळेगाव एमआयडीसी आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भाजे लेणी येथील धबधब्याजवळ पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलीस हवालदार ठोंबरे, महिला पोलीस शिपाई खेडकर, या सर्वांना बंदोबस्तासाठी तैणात केले. धबधब्यावरून पडणारे पाणी पाहून या सर्वच पोलीस कर्मचाऱ्याना कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी धबधब्याच्या पाण्यात केशरी आणि हिरवा हा रंग सोडत एक नयन रम्य दृष्य तयार केले.  या दृष्याचा तीन ते चार हजार पर्यटकांनी आनंद घेतला. एवढेच नाही तर काहींनी तीन रंगात वाहणाऱ्या धबधब्याला कॅमेऱ्यात कैदही केले. काहींनी व्हाट्सअॅपचे स्टेट्स म्हणूही हा व्हिडिओ ठेवला आहे. त्यामुळे स्वातंत्रदिन साजरा करण्याची  पोलिसांची ही कल्पना भन्नाट होती, असेच म्हणावे लागेल.