माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. आतापर्यंत माळीण गावातील मृत व्यक्तींच्या वारसांसाठी सात कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील माळीण दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तींच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रूपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मानवतावादी दृष्टीकोनातून पुनर्वसनासाठी तातडीचे सहाय्य म्हणून १ ऑगस्ट २०१४ रोजी दोन कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून देण्यात आले होते. उर्वरित पाच कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. जिल्हाधिकाऱय़ांकडून ही रक्कम संबंधितांना वितरीत केली जाईल.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी