प्रियंका गांधींमध्ये इंदिरा गांधी दिसतात मग प्रकाश आंबेडकरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर का दिसत नाहीत ? असा सवाल एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे वंचित बहुजन आघाडी सभेच्या जाहीर सभेत बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले दिलेले आश्वासने पूर्ण न केल्यास जनता सळो की पळो करेल. हे कोणासाठी होते ते सांगायची गरज आहे का? मग आता पोलिसांनी भाजप मंत्री आणि नेत्यांना सुरक्षा द्यावी, ही जनता काय करेल हे तर गडकरीनींच सांगितले असे इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना बारा जागा देऊन त्यांना मान-सन्मान द्यावा असे त्यांनी सांगितले.