पावसाळ्यात सार्वजनिक ठिकाणी, घरात सतर्कता हवी

महावितरणचे आवाहन

शहरात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने वीज यंत्रणेबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी सार्वजनिक तसेच घरगुती वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे तसेच घरगुती उपकरणांपासून सावधानता बाळगावी. त्याचप्रमाणे धोकादायक परिस्थिती दिसल्यास तातडीने यंत्रणेशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठय़ा फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी चोवीस तास सुरू असणाऱ्या कॉलसेंटर्सचे १९१२ किंवा १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठय़ात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.  पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेबाबत घरात काय काळजी घ्याल

  • पावसाळ्यात घरातील स्विचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  • घरातील वीजपुरवठय़ाला आवश्यक अìथग केल्याची खात्री करून घ्यावी.
  • घरात शॉर्टसíकट झाल्यास मेनस्विच तत्काळ बंद करावा.
  • घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
  • ओल्या कपडय़ांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
  • स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विचबोर्डापासून बंद करावीत.
  • विशेषत: टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी पाययोजना कराव्यात.
  • विजेच्या खांबाना दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.