लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एका पराभवाने सर्व संपले असे नाही. आजवर अनेक नेत्यांनी पराभव पाहिला आहे. अशी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे भावूक झाले होते. तर आता या पुढील काळात प्रत्येक कार्यकर्त्याने तालुका, जिल्ह्यात संघटनेचे काम वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याच्या अनेक भागातून शेतकरी सहभागी झाले होते.