जमीन बळकावणे, खंडणी, धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पुण्यातील रवींद्र बऱ्हाटे टोळीवर आणखी एका गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. मुख्य सूत्रधार बऱ्हाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. बऱ्हाटे याच्या पाच मालमत्ता प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने जमीन बळकावणे, फसवणूक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर पुन्हा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी रवींद्र बऱ्हाटे (रा. मधुसूदन अपार्टमेंट, लुल्लानगर), बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार (दोघे रा. सोमवार पेठ पोलीस वसाहत), कथित पत्रकार देवेंद्र जैन (प्रियदर्शिनी सोसायटी, सिंहगड रस्ता), प्रशांत जोशी (रा. कृष्णलीला सोसायटी, कोथरूड), प्रकाश फाले (रा. हिरकणी सोसायटी, जुनी सांगवी), विशाल तोत्रे (रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत), संजय भोकरे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, धनंजय सोसायटी, कोथरूड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी विभागाचे सहायक आयुक्त रमेश गलांडे यांनी बऱ्हाटे टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

दोन महिन्यांत सात ‘मोक्का’

मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुंड टोळ्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनीही या टोळ्याविरोधात कडक भूमिका घेतली असून, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड टोळ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत सात टोळ्यांवर मोक्का कारवाई केल्याने गुंड टोळ्यांना जरब बसली आहे.