पुणेकर सध्या तीव्र उन्हाळा अनुभवत आहेत. उन्हाळ्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. या झळांनी अनेकांना आजारपण येत आहे. रिक्षा व्यावसायिकांसह इतरही व्यावसायिकांना उन्हाचा फटका बसत आहे; पण त्या बरोबरच उन्हाळ्यामुळे पर्यटकांची गर्दीही पुण्यात वाढत आहे. शिवाय उन्हाची  तीव्रता वाढल्यामुळे कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांऐवजी निसर्गत:च पिकलेले आंबे खाण्याचा अनुभव पुणेकरांना मिळत आहे.