पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे एका भरधाव ट्रकने सहा नागरिकांना उडवले. या घटनेत एक ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थी जखमी असून त्यापैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-सोलापूर मार्गावरील उरुळी कांचन येथे आज (गुरूवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही वाहने उभी होती. या रस्त्यावर वामन कांचन (वय ७५) हे श्रीगोंद्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. त्यांच्या शेजारीच महाविद्यालयासाठी जाण्यासाठी ५ ते ६ विद्यार्थी थांबले होते. याचदरम्यान भरधाव ट्रकने प्रथम काही वाहनांना उडवले व नंतर बसची वाट पाहत असलेल्या वामन कांचन व विद्यार्थ्यांना उडवले. यात कांचन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला. पोलीस तपास करत आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.