वडाच्या पारंब्यांना लटकून घेतलेले झोके.. दगड मारून तोडलेल्या चिंचा, बोरं आणि कै ऱ्या.. ऊस चोरून पळवून नेत असताना मागे लागलेले राखणदार.. अशा ग्रामीण जीवनातील गमतीजमती शहरी संस्कृतीमध्ये कशा अनुभवता येणार. हे ध्यानात घेऊन अनाथाश्रमातील मुलींसाठी चिंचा, कैऱ्या, आवळे अशा उन्हाळी रानमेव्याची चव हा अभिनव उपक्रम राबविला आणि मुलींनीही तोंड आंबट-गोड करीत हा रानमेवा चाखण्याचा आनंद लुटला. वीर शिवराज मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे अनाथ हिंदूू महिलाश्रमातील मुलींसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी आपल्या बालपणी केलेल्या गमती सांगत या मुलींशी मनमोकळा संवाद साधला. क जीवनसत्व असलेला हा रानमेवा चाखण्यासाठी एकदा तरी गावाकडे जायला हवे असे त्यांनी सांगितले.