हिंजवडीतील साखरे वस्ती भागामध्ये नवविवाहित दाम्पत्य बुधवारी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दाम्पत्यापैकी नवऱयाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय असून, पत्नीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. 
मोहन आणि नयना चौधरी असे या दाम्पत्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेले हे दोघेही साखरे वस्ती भागामध्ये राहात होते. मोहनने घरातच गळफास लावून घेतल्याचे त्याचा भाऊ आत्माराम चौधरी याने बुधवारी सकाळी पाहिले. तिथेच जवळ नयना यांच्याही मृतदेह पडल्याचे त्यांना दिसले. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनानंतरच दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मोहन हिंजवडी परिसरात किराणा व्यवसायिक होता होता.