कासारवाडी ते पिंपरी दरम्यान रेल्वेखाली उडी मारून एका प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी सहाच्या सुमारास घडली.
तिवारी (संपूर्ण नाव समजू शकले नाही, वय २५ वर्ष, रा. खारघर, मुंबई) असे मुलाचे नाव आहे. तर रजनी सिंग (वय १८, रा. कुदळवाडी, चिखली) असे मुलीचे नाव आहे. रजनी ही बीसीएला शिकत होती. गत दोन दिवसांपासून हे दोघेही बेपत्ता होते. दोन दिवस शोध घेऊनही न मिळाल्याने रजनीच्या कुटुंबीयांनी सोमवारी (दि. २४) रात्री निगडी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तिवारीची खारघर पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी या दोघांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह वायसीएम रूग्णालयात हलवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव तपास करत आहेत.