स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी ‘नारी समता मंच’ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

व्यापक कार्य

महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.