पिंपरी-चिंचवडमध्ये  विराज विलास जगताप  या वीस वर्षीय तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी जेरबंद आहेत. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शास येत आहे.  या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे केल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले की, ८ जून रोजी विराजचा खून झाला. तांत्रिक आधारे गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की, पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. घटनेचा जो तपास होईल तो पुराव्याच्या आधारावर होईल.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

संबंधित घटनेप्रकरणी काहीजण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सायबर सेल हे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. जातीय तेढ निर्माण होईल असं काही कृत्य करू नका. सोशल मीडियावर कमेंट किंवा इतर गोष्टी प्रसारित करू नयेत. तसं कोणी केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.