पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) ९६.५३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित ११९९ कोटी रुपयांची रक्कम १११ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा राज्यात २१० साखर कारखान्यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना एकूण ३४ हजार ५४२ कोटी रुपयांची एफआरपी देणे होते. त्यांपैकी ३३ हजार ३४३ कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, अद्यापही ३.४७ टक्के म्हणजे ११९९ कोटी रुपयांची रक्कम १११ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. राज्यातील २१० पैकी ९९ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. ९० टक्क्यांहून जास्त एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या ८६ आहे. साठ टक्क्यांहून अधिक एफआरपी देणारे १६, तर साठ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे नऊ कारखाने आहेत. या नऊ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने आरआरसीची नोटीस बजावली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1119 crores frp due on 111 sugar mills zws
First published on: 07-06-2023 at 06:40 IST