नारायणगाव : जुन्नर येथील श्री विघ्नहर साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच उसाची रक्कम अदा करण्यात येणार असून, कामगारांना १२ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३७ व्या गळीत हंगामाची सुरुवात नुकतीच करण्यात आली. त्यावेळी याबाबतची माहिती देण्यात आली. माजी आमदार दिलीप ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आदींच्या हस्ते पूजन करू गव्हाणीत मोळी टाकण्यात आली

हेही वाचा >>>‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली ; १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

साखर निर्यातीच्या धोरणाबाबत सत्यशील शेरकर म्हणाले, की केंद्र सरकाने जून २०२२ पासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणले असल्याने भारतातून निर्यात होणारी साखर पूर्णपणे थांबली. परिणामी देशांर्तगत साखरेचे भाव स्थिर राहिले. केंद्र सरकारने निर्यातीवरील बंदी तत्काळ उठवून साखर निर्यातीचा मार्ग मोकळा करावा. सुमित्रा शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप आदींसह सर्व आजी माजी संचालक त्या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : ‘एएफएमसी’च्या संचालकपदी आरती सरीन

इथेनॉलच साखर कारखान्यांना वाचविणार
साखरेपासून कारखान्यांचा उत्पादन खर्च निघणे मुश्कील आहे. इथेनॉल प्रकल्पच भविष्यकाळामध्ये साखर कारखानदारीला वाचविणार असून, केंद्र सरकारचे धोरण इथेनॉलसाठी पूरक आहे. विघ्नहरच्या विस्तारीत इथेनॉल प्रकल्पाची किंमत सुमारे १११ कोटी आहे. बँकेकडून ९३ कोटी इतके कर्ज मंजूर झाले आहे . त्यामध्ये स्वनिधी म्हणून जवळपास १९ कोटी टाकावे लागणार असून लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.