धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या लगत डोंगर फोडून होत असलेल्या बांधकामांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील गाळ जलवाहिन्यांतून थेट महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येत आहे. पर्वती, वडगांव आणि भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रात दैनंदिन २० ते २१ टन गाळ येत असून तो बाहेर काढला जात आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीत गाळाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे. धरणातील गाळ जलशुद्धीकरण केंद्रात येत असला तरी योग्य ती प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जात असून शुद्ध पाण्याचे वितरण महापालिकेकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून धरणातून प्रतीदिन १ हजार ६५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. तर वर्षाला २२ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढे पाणी घेतले जाते. बंद जलवाहिनीद्वारे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. यापूर्वी कालव्यातून पाणी विद्युत पंप लावून घेतले जात होते. मात्र पाणी गळती, चोरी रोखण्यासाठी आता बंद जलवाहिनीद्वारे पाणी घेण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनीतून पाण्याबरोबर माती मिश्रित गाळही येतो. जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात हा गाळ पाण्यातून वेगळा केला जातो. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १२ टन, वडगांव जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज सहा टन आणि भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रातून २.५ टन एवढा गाळ बाहेर काढला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 tons of sludge daily in water treatment plants pune print news amy
First published on: 12-08-2022 at 09:43 IST