पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून अवघ्या ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हे धरण सध्या भरण्याच्या मार्गावर असून येत्या दोन-तीन दिवसांत या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. उजनीत सध्या सुमारे ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी असून, पुणे जिल्ह्यातून होणाऱ्या विसर्गावरच त्यातील बहुतांश पाणीसाठा जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडताही केवळ पुणे जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे आणि या धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे दरवर्षी उजनी धरण १०० टक्के भरते. त्यामुळे पुण्यातील धरणे सोलापूरकरांची तहान दरवर्षी भागवतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवरील माढा तालुक्यातील उजनी हे धरण पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या उजनी जलाशयात १३ हजार २३३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दौंड येथून, तर बंडगार्डन येथून ११ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या हे धरण ९१.५० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. उजनी धरण भरण्यास केवळ पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे उजनीद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा मुख्य सांडवा उघडण्यात आला आहे. या सांडव्यातून ५०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 tmc of water in ujni in pune district pune print news amy
First published on: 12-08-2022 at 10:26 IST