पुणे : नांदेड येथील रुग्णालयात २४ नागरिकांचा बळी गेला असून त्या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. तर या विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, नांदेड येथील रुग्णालयात उपचाराअभावी निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. मागील तीन दिवसांत महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा – पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!, दीडशे मीटरचा पादचारी पूल उभारणार
करोना काळात उद्धव ठाकरे
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’
खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे – सुषमा अंधारे
नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता शाम वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी शौचालय साफ करण्यास लावल्याची घटना घडली. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत सुषमा अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हेमंत पाटील यांना एवढी मस्ती येते कुठून, आदिवासी अधिकाऱ्याला स्वच्छता करायला लावता. नांदेडमधील प्रकरण झाकण्यासाठी हे करण्यात आल आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांबाबत एखाद्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर लगेच संबधित व्यक्तीवर तातडीने कारवाई होते. पण एका आदिवासी भागातील अधिकाऱ्याबाबत जो प्रकार खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनदेखील राज्याच्या गृहमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, असा सवालदेखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.